शुक्रवार, 2 सितंबर 2011

नाशिक येथे छात्रपुर्व प्रशिक्षण


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.455                        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.2 सप्टेंबर 2011
------------------------------------------------------------------------------------------------------------       
वर्धा,दि.2- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आला आहे. सदरच्या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्यदलातील तज्ञ अधिका-यांकडुन प्रशिक्षण मिळणार आहे.
     कम्बाईन डिफेंस सर्विसेस (CDS) या परिक्षेत उत्तिर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीव्दारे सैन्यदलात अधिकारी होउ इच्छिणा-या तसेच ज्या महाराष्ट्रीयन नवयुवक/युवतीना सशस्त्र सैन्यदलाकडुन एस.एस.बी. परिक्षेची (SSB) मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे अशा उमेदवारांना SSB मुलाखतीच्या पुर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे प्रत्येकी 10 दिवसांचे दोन प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहेत.
     प्रशिक्षण वर्गाचा कालावधी दिनांक 20 सप्टेंबर 2011 ते 29 सप्टेंबर 2011 एकुण 10 दिवस असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामुल्य करण्यात आलेली असून भोजनासाठी प्रती दिवस रुपये 19/- प्रमाणे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल.
     पात्र उमेदवारांनी विनामुल्य प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेणेसाठी दिनांक 15 सप्टेंबर 2011 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय वर्धा येथे पूढिल प्रमाणे पात्रता धारण करीत असतील अशाच उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रीकेच्या मुळ प्रतीसह मुलाखतीस हजर रहावे.
     एस.एस.बी. प्रवेश वर्गासाठी पूढिल प्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे.1) SSB मुलाखतीचे पत्र (प्राप्त झाले असल्यास) किंवा CDS लेखी परिक्षेत उत्तिर्ण झालेचे प्रमाणपत्र किंवा स्पेशल एंट्रीव्दारे SSB करिता अर्ज पाठविलेबाबतचा पुरावा आणावा. 2) एन.सी.सी.(सी) सर्टिफिकेट A/B ग्रेड धारक उमेदवारांने एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने शिफारस केल्याचे प्रमाणपत्र बरोबर आणावे 3) एनडीए मधील परिक्षा उत्तिर्ण असल्याचा पुरावा आणावा व सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी रोजगार समाचार पत्रानुसार टेक्नीकल/ मेडीकल किंवा इतर अधिकारी पदासाठी अर्ज केले असल्यास अर्जाची छायांकीत प्रत सोबत आणावी.
     वरील प्रशिक्षण वर्गाचा जास्तीत जास्त पात्र महाराष्ट्रातील तरुण/तरुणीनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें